Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोण बाजी मारणार? माळेगाव कारखाण्याचा फैसला आज! चंदरराव तावरे विरुद्ध अजित पवार – थरारक लढतीकडे राज्याचे लक्ष



फलटण चौफेर दि २४ जून २०२५ 

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली असून, आज मतमोजणीतून निकाल लागणार आहेत. चंदरराव तावरे यांच्या नेतृत्वाखालील गट आणि अजित पवार समर्थक गट यांच्यात थेट सामना रंगला असून, या निकालाकडे संपूर्ण साखर क्षेत्राचे लक्ष लागले आहे.


संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत दोन्ही गटांनी जोरदार प्रचार केला. गावागावांमध्ये बैठका, कार्यकर्त्यांची घराघरात धडक मोहीम, सभासदांना आकर्षित करण्यासाठी विकासाची आश्वासने दिली गेली. मतदारांना वळवण्यासाठी दोन्ही गटांत चढाओढ सुरु होती.


गेल्या काही वर्षांत चंदरराव तावरे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने आर्थिक पुनरुज्जीवन साधल्याचा दावा त्यांच्या गटाने केला आहे. सभासदांना वाढीव दराने पैसे दिले, ऊस दराबाबत सकारात्मक भूमिका घेतली आणि कारखान्याचे आर्थिक गणित मजबूत केले.दुसरीकडे, अजित पवार समर्थक गटाने राज्यस्तरीय राजकीय नेटवर्कचा फायदा घेत कारखाना आपल्या हातात घेण्याची जोरदार तयारी केली आहे. अजित पवार गटाने यावेळी नव्या चेहऱ्यांवर विश्वास ठेवला असून, कारखान्याला अधिक प्रगतीच्या दिशेने नेण्याचे आश्वासन दिले आहे.


आज सकाळपासून मतमोजणीची प्रक्रिया सुरु झाली असून, परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. समर्थकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासन सतर्क आहे माळेगाव कारखान्याची ही निवडणूक केवळ स्थानिक नाही तर संपूर्ण जिल्ह्यात आणि साखर क्षेत्रात चर्चेचा विषय ठरली आहे. कोण बाजी मारणार, हे ठरवणारी काही तासांची प्रतिक्षा आता सर्वांनाच लागली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.